Shivaji Maharaj and Dadoji Kondadev

पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा जो प्रसंग लाल महालाच्या जागेत शिल्पबद्ध करण्यात आला आहे, त्या शिल्पात दादाजी कोंडदेवाचा समावेश असावा यात गैर तर काही नाहीच, उलट अशा इमानी पुरुषाचा समावेश त्या शिल्पात असावा ही गोष्ट अत्यंत उचित अशीच आहे.
आदिलशाहीने वैराण केलेल्या पुणे परगण्याची पुन्हा भरभराट करण्याकरिता शाहजी महाराजांनी दादोजी कोंडदेवाची नेमणूक केलेली होती. पुणे परगणा व त्याच्या आसपासचा जो मुलूख शाहजी महाराजांकडे जहागीर म्हणून होता, त्याचा कारभार शाहजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार या नात्याने दादाजी कोंडदेव पाहात असे. दादाजी कोंडदेवाचा जुन्यातला जुना उल्लेख इ.स. १६३३ मधील एका पत्रात आला आहे. पुणे परगण्यातील महमदवाडी या गावासंबंधीचे हे पत्र आहे. त्यात त्या गावचा पाटील जाऊ पाटील याने लिहून दिले आहे की :
बापूजी देऊ पाटील घुले हा आपला भाऊ दुष्काळ पडला म्हणून गाव सोडून परमुलखाला गेला. त्यावर वडील तो मेले. आम्ही वाचलो. सुकाळ झाला. यावर दादाजी कोंडदेव सुभेदार दिवाण झाले. त्यांनी मुलूख लावला. देशमुख देशकुलकर्णी यांना ताकीद केली की, ‘‘हा गाव पडला, पाटील आणऊन गाव लावणे.’’ मग आपणास नेऊन कौल (म्हणजे अभय, आश्वासन) देऊन गाव लावला.’
याच प्रकरणी, याच तारखेचा व याच आशयाचा, एक कागद गोताच्या साक्षीने करण्यात आला. त्यातही ‘‘राजश्री दादाजी कोंडदेव सुभेदार येऊन गावाची गाव लाविला’’ (म्हणजे ओसाड पडलेली गावे परत वस्ती करवून भरभराटीस आणली.) असा उल्लेख आहे.
शाहजी महाराज आणि मातुश्री जिजाबाई यांच्याविषयी दादाजी कोंडदेवाची काय भावना होती? छत्रपती शाहू महाराजांनी शिरवळ परगण्याच्या देशकुलकण्र्याविषयीच्या एका तंटय़ाचा निवाडा करून त्या परगण्याचा देशपांडे म्हणजेच देशकुलकर्णी, यादो गंगाधर, याला दिलेले १ ऑक्टोबर १७२८ या तारखेचे एक अस्सल वतनपत्र उपलब्ध आहे. पुरावा म्हणून जी कागदपत्रे शाहू महाराजांसमोर त्या प्रकरणी दाखल करण्यात आली त्यात दादाजी कोंडदेवाने शिरवळ परगण्याच्या हवालदाराला पाठवलेले २ एप्रिल १६४६ या तारखेचे एक अस्सल पत्र होते. ते पत्र छत्रपती शाहू महाराजांनी ग्राह्य मानले आहे आणि वर नमूद केलेल्या त्यांच्या वचनपत्रात उद्धृतही केले आहे. दादाजी कोंडदेवाच्या त्या पत्रात जिजाबाई साहेबांचा उल्लेख ‘सौभाग्यवती मातुश्री जिजाआऊ साहेब’ असा आला आहे. राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांच्याविषयी खोटा, गलिच्छ व हलकट मजकूर लिहिणारा जेम्स लेन आणि त्या हलकट मजकुराचा प्रचार व प्रसार करणारी मंडळी यांना दादाजीच्या पत्रातला हा ‘मातुश्री जिजाआऊ साहेबांचा’ उल्लेख हे चोख उत्तर नाही का?
शाहजी महाराजांच्या नोकरीत सुभेदार म्हणून काम करीत असताना दादाजीला वतनांसंबंधीच्या निरनिराळ्या तंटय़ांचे निवाडे करावे लागले गोतसभेत दादाजीच्या उपस्थितीत झालेल्या अशा निदान नऊ निवाडय़ांची कागदपत्रे उपलब्ध आहेत. दादाजी कोंडदेवाने उजाड झालेला मुलूख पुन्हा लागवडीखाली आणला, अशा आशयाचा उल्लेख अनेक कागदपत्रांमध्ये व बखरींमध्ये आलेला आहे.
पुणे परगण्यातील बाणेरे (सध्याचे बाणेर) या गावी दादाजी कोंडदेवाने पिण्याच्या पाण्याकरिता पाट बांधून आणल्याचा उल्लेख एका पत्रात आला आहे. (पेशवे दप्तरातून निवडलेल कागद, खंड ३१, लेखांक ६५). पुण्यातून वाहणाऱ्या आंबील ओढय़ाला दादाजी कोंडदेवाने धरण बांधल्याचा उल्लेखही एका जुन्या कागदात आहे. (पुणे नगर संशोधन वृत, खंड १, टाचण क्र. ४८)
दादाजीच्या नि:स्पृहतेची द्योतक अशी एक हकीकत एक्याण्णव कलमी बखरीत सांगितलेली आहे. दादाजीने शिवापूर येथे शाहजीच्या नावे (शाहबाग नावाची) आंबराई लावली होती. तिच्यातील एक आंबा त्याने अनवधानाने तोडला, ही आपली चूक झाली असे वाटून तो स्वत:चा हात कापण्यास निघाला, पण लोकांनी त्याला त्या विचारापासून परावृत केले, तेव्हा त्याने स्वत:च्या अंगरख्याची एक बाही कापून लांडी केली. हा वृत्तान्त शाहजी महाराजांना समजल्यावर त्यांनी दादाजीला दिलासा देण्याकरिता मानाची वस्त्रे पाठविली आणि त्यानंतर दादाजीने लांडी बाही वापरण्याचे सोडून दिले. असा त्या हकीकतीचा आशय आहे. अशाच अर्थाची हकीकत चिटणीस बखरीत देखील सांगितलेली आहे. ही हकीकत किंवा अख्यायिका नि:स्पृहपणाबद्दल दादाजीच्या असलेल्या लौकिकाची द्योतक आहे. तसा त्या अख्यायिकेचा अन्वयार्थ करवीर संस्थानचे अधिपती छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आश्रयाने श्री. कृष्णराव अर्जून केळूसकर यांनी इ.स. १९०६ मध्ये लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात लावलेला आहे. त्या अख्यायिकेचा तसाच अन्वयार्थ ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ या ग्रंथाचे संपादक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘मराठी सत्तेचा उदय’ या त्यांच्या ग्रंथात लावला आहे. खुद्द छत्रपती शाहू महाराज (सातारचे) यांनी ‘मागे दादाजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला, परंतु त्याने जे इनसाफ केले ते अवरंगजेब पादशहासही वंद्य जाहले’, असे उद्गार एका प्रसंगी काढल्याचे एका समकालीन पत्रात नमूद केलेले आहे. शाहूंचे ते उद्गार न्यायीपणाबद्दल दादाजीचा काय लौकीक होता याचे द्योतक आहेत.
दादाजीने केले असेल ते रास्तच असेल असा भरवसा खुद्द शिवाजी महाराजांनाही वाटत असे, असे अनेक समकालीन कागदपत्रांवरून दाखवून देता येते. उदाहरणार्थ : मावळचा सुभेदार महादाजी सामराज याने कऱ्यात मावळ तरफेचा हवालदार महादाजी नरस प्रभू याला पाठविलेले ७ ऑक्टोबर १६७५ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात शिवाजी महाराजांनी महादाजी सामराजास पाठविलेले एक पत्र उद्धृत ेकेले आहे. ‘‘साहेब (म्हणजे शिवाजी महाराज) कोणाला नवे करू देत नाहीत; दादाजी कोंडदेवांच्या कारकीर्दीत चालत आले असेल ते खरे’’ असे शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात म्हटले आहे. पुणे परगण्याच्या नीरधडी तरफेतील परिंचे या गावच्या पाटीलकीविषयी शिवाजी महाराजांनी निरथडी तरफेचा हवालदार तानाजी जनार्दन याला पाठविलेले २६ जून १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रातही ‘वैकुंठवासी साहेबांचे (म्हणजे शाहजी महाराजांचे) व दादाजी पंतांचे कारकीर्दीस चालिले आहे ते करार आहे, तेणेप्रमाणे चालवणे, नवा कथला करू न देणे’ असे म्हटले आहे. पुणे परगण्याच्या कऱ्हेकठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंटय़ाविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र आहे. त्यात या प्रकरणी ‘‘मागे.. दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीस ऐसे चालिले असेली, राजश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रणाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’’ असा ‘हुकूम राजश्री साहेबी’ (म्हणजे शिवाजी महाराजांनी) केला असल्याचे नमूद केले आहे. मावळांमधील मुठे या गावच्या पाटीलकीविषयी एक नवा तंटा सुरू झाला होता. त्याविषयी शिवाजी महाराजांनी देशाधिकारी कोन्हेर रुद्र याला पाठविलेले १ नोव्हेंबर १६७८ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रातही ‘दादाजी कोंडदेव यांचे वेळेस चालिले असे तेणेप्रमाणे चालवणे’ असे म्हटले आहे.
शिवचरित्रसाहित्य, खंड ३ मधील ३९९ व्या लेखांकात पुरंदर किल्ल्ल्याची हकीकत आली आहे. तिच्यात शिवाजी महाराजांनी पुरंदरचा किल्लेदार महादाजी नीलकंठराव याला लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख आहे. ‘‘दादो कोंडदेव आम्हाजवळ वडिली ठेऊन दिल्हे होते, ते मृत्यो पावले, आता आम्ही निराश्रीत झालो.’’ असे त्यात म्हटले आहे.
दादाजी कोंडदेव हे शाहजी महाराजांचे सुभेदार होते. त्यांनी शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधावयाची तजवीज केली आणि शिवाजी महाराजांच्या नावे शिवापूर नावाची पेठ वसविली अशी माहिती खेडेबाऱ्याच्या देशपांडय़ांच्या करिन्यात आहे.
दादाजी कोंडदेवाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी पाठविलेल्या अनेक पत्रांमध्ये ‘‘दादाजी कोंडदेव सुभेदार यांना देवाज्ञा झाली’’ असा आदरयुक्त उल्लेख आला आहे.
पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख फक्त सहा कलमी शकावलीत आहे. तिच्यातील शेवटच्या कलमातील तो उल्लेख असा आहे :
‘‘शके १५५७ युव नाम संवत्सरी शाहजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली. सरंजामास मुलूक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिल्हा. राज्यांनी (म्हणजे शाहजी राजांनी) आपले तरफेने दादाजी कोंडदेव मलठणकर यांसी सुभा सांगून पुणियास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला. शांती केली. मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली.’’
पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडास आला आहे आणि त्यात दादाजी कोंडदेवाचा स्पष्ट उल्लेख आहे.
दादाजी कोंडदेवाने केलेल्या कामगिरीचे आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आदराचे द्योतक असे खुद्द शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील आणि इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रांमधील पुरावे वर दिले आहेत. बखरींमधील उल्लेखही त्या पुरव्यांशी सुसंगत व त्यांना पूरक असेच आहेत. तेव्हा ते प्रमाण मानण्यास हरकत नाही.
शिवछत्रपतींची ९१ कलमी दादाजीविषयी काय म्हणते पहा-
‘‘पुणे तहद वाई, सिरवल, सुपे, इंदापूर हा प्रांत जहागीर दरोबस्त दिधली ते समई शाहजीराजे यांणी दादाजी कोंडदेव कुलकर्णी, मौजे मलठण.. लिहिणार, इमानी जाणून त्यांचे स्वाधीन मुलूख कुल येखतीयारी देऊन ठेविले..दादाजी कोंडदेव त्यांचे स्वाधीन मुलूख केला ते समई (शाहजी राजांनी त्यांना) सांगितले जे चिरंजीव (शिवाजी महाराज) व स्त्री (जीजाबाई) जुनरी आहेत त्यांच आपल्यापासी आणून महाल बांधोन उभयेतास अन्नवस्त्रे देऊन चिरंजीवास (म्हणजे शिवाजी महाराजांना) शाहणे करणे. हे आज्ञा करोन शाहजी राजे विज्यापुरास गेले. दादाजीपंती सिवनेरीहून जिजाऊसव सिऊबास आणून पुढे लाल महाल बांधोन उभयेतास बरे इजतीने ठेविले.. सिऊबास शाहणे केले.’’
त्याच बखरीत ‘‘दादाजीपंताचा मृत्यू झाला ते समई सोळा-सतरा वर्षांंचे शिवाजीराजे होते, त्यांणी बहुत शोक दादाजीपंत क्रमले (म्हणजे मृत्यू पावले) ते समई केला’’ असेही सांगितले आहे.
श्रीमंत महाराज भोसले त्यांची बखर, म्हणजेच शेडगावकर भोसले बखर, या बखरीतही शाहजी राजांची जहागीर भरभराटीस आणण्याकरिता दादाजीने केलेल्या व्यवस्थेचे तपशीलवार वर्णन केले आहे. आणि शेवटी ‘‘शिवाजीराजे ह्यास विद्याभ्यास करणारा सिक्षाधारी (म्हणजे शिक्षक) होता, त्यांणी विद्याभ्यासात सिवाजीराजे ह्यांस तयार केले’’ असे म्हटले आहे.
शिवादिग्विजय बखरीतदेखील ‘‘शिवाजी महाराज पुणे प्रांती राहून दादाजीपंती विद्याभ्यास करविला; मल्लयुद्ध, शस्त्रयुद्ध करावयाच्या गती शिकविल्या’’ असे म्हटले आहे.
येथवर दादाजीपंताच्या कामगिरीविषयीचे पुरावे काय आहेत ते संक्षेपाने सांगितले. आता या व इतर पुराव्यांवरून नामवंत इतिहासकारांनी काय निष्कर्ष काढले आहेत ते थोडक्यात सांगतो.
करवीर संस्थानचे अधिवती श्री छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आश्रयाने श्री. कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र १९०६ मध्ये प्रकाशित झाले. त्यात दादाजीच्या इमानी व स्वामिकार्यदक्ष प्रवृत्तीचे आणि शाहजी महाराजांची जहागीर भरभराटीस आणण्याकरिता त्याने केलेल्या कार्याचे विस्तृत वर्णन केले आहे आणि ‘‘अशा या प्रामाणिक, धर्मशील व पापभीरू पुरुषाच्या स्वाधीन आपल्या पुत्रास करण्यास शहाजीराजांस काहीएक दिक्कत वाटली नाही, हे साहजिक आहे आणि दादाजीनेही आपल्या धन्याच्या ह्या गुणी व हुशार मुलाचे संगोपन मोठय़ा प्रेमाने व दक्षतेने केले’’ असे म्हटले आहे. श्री. केळूसकर यांनीच पुढे असेही सांगितले आहे की ‘‘सारांश जमाबंदीची व्यवस्था नीट लावून प्रजा आबाद कशी राखावी, शेतकऱ्यांस उत्तेजन देऊन उत्पन्न कसे वाढवावे, घोडे वगैरे जनावरांची जोपासना कशी करावी, शिपाई-प्यादे वगैरे नोकर पदरी ठेवावयाचे ते कसे पारखून ठेवावे, नोकरांस राजी राखून त्यांच्याकडून इष्ट कामे कशी बिनबोभाट करवून घ्यावी, पागा व लष्कर यांची शिस्त कशी राखावी, इत्यादी गोष्टींचे ज्ञान महाराजांस दादाजीकडून अल्प वयातच चांगले प्राप्त झाले. ह्या अनुभवाचा व ज्ञानाचा परिपाक पुढे किती उत्तम प्रकारे झाला व त्यापासून कोणती कार्ये उद्भवली ते सर्व जगास विदित आहे.’’
‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ या ग्रंथाचे संपादक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘मराठी सत्तेचा उदय’ या त्यांच्या ग्रंथात दादाजी कोंडदेवाच्या कार्याचे मूल्यमापन अशाच प्रकारे केले आहे. ते म्हणतात ‘‘दैनंदिन राज्यकारभारातील दादोजीची उदाहरणे संस्कारक्षम महाराजांच्या मनावर परिणाम करून गेल्याशिवाय राहिली नाहीत,’’ ‘‘अशी नीतिमत्ता असणारा शिक्षक महाराजांना मिळाल्यामुळेच पुढे त्यांच्या कारभारातही हा आदर्श दिसून येतो,’’ ‘‘शिवाजी महाराजांना सदरेवर बसवून त्यांच्यासमोरच तंटय़ांची सुनावणी व निकाल दिला जात असे, असे करत असता, महाराजांना न्यायदानाचे प्रशिक्षण मिळावे हाच त्याचा (म्हणजे दादोजी कोंडदेवाचा) हेतू होता, ’’ ‘‘सारांश, जिजाईसारखी माता व दादोजी कोंडदेवासारखा पालक महाराजांना लाभल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्वाभिमान, स्वधर्मनिष्ठा, नीतिधैर्य, धाडस, शौर्य, राज्यकारभारकौशल्य, मुत्सद्देगिरी इत्यादी राज्यकर्त्यांस आवश्यक असणारे गुण निर्माण झाले व त्यांची पुढे वाढ होऊन महाराष्ट्राला हा थोर राजा लाभला.’’
डॉ. जयसिंगराव पवार यांच्याच ‘शिवाजी आणि शिवकाल’ या ग्रंथातही वरील आशयाचीच मते त्यांनी व्यक्त केली आहेत.
प्रा. रा. ज्ञा. गायकवाड (प्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा), प्रा. बा. शं. सूर्यवंशी (इतिहास विभाग प्रमुख, न्यू कॉलेज, कोल्हापूर) आणि प्रा. विलास पाटील (छ. शिवाजी कॉलेज, सातारा) या तिघांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज व शिवयुग’ या ग्रंथातही दादाजी कोंडदेवाच्या कामगिरीचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्यात ते म्हणतात ‘‘दादाजी कोंडदेव याचा शिवाजीचा गुरू म्हणून उल्लेख केला तर यात काहीच अवास्तव नाही, कारण याने शिवाजीला राज्यकारभार, न्यायदान इ. क्षेत्रातील शिक्षण दिले, ’’ ‘‘जहागिरीचा कारभार दादोजी पाहत असताना शिवाजी त्याच्या सान्निध्यात नेहमी असे, त्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण शिवाजीला मिळत होते,’’ ‘‘शिवाजी पुढे जो उत्तम प्रशासक, मुत्सद्दी राजकारणी, न्यायनिष्ठुर न्यायाधीश, कुशल सेनापती झालेला दिसतो हे दादोजी कोंडदेवाच्या प्रयत्नाचे व शिक्षणाचेच फळ होते.’’
इ.स. १६४४ मध्ये शाहजी राजांवर आदिलशाहाची इतराजी झाली आणि शाहजी राजे आदिलशाही दरबार सोडून गेले. तेव्हाही दादाजी कोंडदेवाने शाहजी राजांची साथ सोडली नाही. ‘शाहजी भोसले दरबारातून निर्वासित झाला आहे आणि म्हणून त्याचा मुतालिक (म्हणजे प्रतिनिधी) दादाजी कोंडदेव याचे पारिपत्य करण्याकरिता कोंढाण्याकडे स्वारी पाठविली आहे’ अशा अर्थाचे मुहम्मद आदिलशाहाने पाठविलेले १ ऑगस्ट १६४४ या तारखेचे एक अस्सल फर्मान कारीच्या जेधे देशमुखांकडे मिळाले आहे. (ऐतिहासिक फारसी साहित्य, खंड १, लेखांक ४८ किंवा इंडियन हिस्टॉरिकल क्वार्टर्ली, खंड ७, अंक २)
शिवाजी महाराजांचे वय तेव्हा लहान असल्यामुळेच त्यांचा त्या फर्मानात उल्लेख नाही. पुढे ते प्रकरण मिटले. शाहजी राजे पुन्हा आदिलशाही दरबारात परतले आणि दादाजी कोंडदेव इ. स. १६४७ मध्ये त्याचा मृत्यू होईपर्यंत शाहजी महाराजांचा सुभेदार म्हणून त्यांच्या पुण्याच्या परिसरातील जहागिरीचा कारभार करीत राहिला.
कठीण प्रसंगातही दादाजी कोंडदेवाने शाहजी राजांची साथ सोडली नाही, हे ह्या संपूर्ण प्रकरणावरून दिसून येते.
सारांश, खुद्द शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील उल्लेख, इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रे आणि बखरी या सर्व प्रकारच्या साधनांमधून दादाजी कोंडदेवाच्या कामगिरीचे एक सुसंगत चित्र आपल्यापुढे उभे राहते. दादाजी कोंडदेव हा शाहजी महाराजांचा विश्वासू सेवक होता, मातोश्री जिजाबाई व बाल शिवाजी यांची पुणे येथील जहागिरीत व्यवस्था ठेवण्याची आणि बाल शिवाजीला शिक्षण देण्याची कामगिरी शाहजी महाराजांनी त्याच्यावर सोपविली होती, त्याने ती उत्तम प्रकारे पार पाडली आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या मनात त्याच्याविषयी आदरभाव होता, असे त्या चित्राचे स्वरूप आहे. या जुन्या पुराव्यांच्या आधारे सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे इतिहासकार श्री. कृष्णराव केळूसकर यांच्यापासून ते सध्याचे नामवंत इतिहासकार प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापर्यंत अनेक विद्वान इतिहासकारांनी दादाजीच्या कार्याचे जे वर्णन केले आहे त्याची रूपरेषाही वरीलप्रमाणेच आहे. पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याची नोंद ज्या एकमेव सहा कलमी शकावलीत आहे त्या नोंदीत देखील दादाजीचा स्पष्ट उल्लेख आहे.
म्हणून, पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा जो प्रसंग लाल महालाच्या जागेत शिल्पबद्ध करण्यात आला आहे, त्या शिल्पात दादाजी कोंडदेवाचा समावेश असावा यात गैर तर काही नाहीच, उलट अशा इमानी पुरुषाचा समावेश त्या शिल्पात असावा ही गोष्ट अत्यंत उचित अशीच आहे. त्या शिल्पबद्ध स्मारकाची किंवा त्यातील कोणत्याही अंशाची तोडफोड करणे ही गोष्ट त्या स्मारकाचा आणि पर्यायाने खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारी ठरेल अशी माझी भावना आहे.
(संदर्भ ग्रंथ : शिवचरित्रसाहित्य, मराठय़ांच्या इतिहासाची साधने, ऐतिहासिक संकीर्ण साहित्य, एक्याण्णव कलमी बखर, चिटणीस बखर, छत्रपती श्री शिवाजी महाराज चरित्र, मराठी सत्तेचा उदय, पेशवे दप्तर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे इतिवृत्त व त्रमासिक, शिवचरित्रप्रदीप, मराठी दप्तर, श्रीमंत महाराज भोसले यांची बखर, शिवादिग्विजय, छत्रपती शिवाजी महाराज व शिवयुग)


Dharalyaca white gold anchor on the context of the city has been the king of the red silpabaddha space, they should be included in the non-value foods Grandpa kondadevaca some illusion, it is so appropriate that this should be a very honest man, including that of the opposite Shilpa.

Adilasahine had been crying the nomination kondadevaci Dadoji Shahaji Maharaj Pune province to flourish again. Pune County and their villages, which was as district Shahaji maharajankade jahagira, its management Shahaji Maharaj's job as the governors of the country watching Grandpa Konddeo. Grandpa used to refer kondadevaca junyatala Category In 1633, a letter was. Pune Province mahamadavadi this letter is gavasambandhice. He wrote that he had written to Patil Patil:
Bapu Patil dissolved to leave the village as was his brother went paramulakhala drought. He died on his father. We may be saved. Sukala was. Grandpa was probably something on Konddeo Diwan. They put tract. Deshmukh had warned the desakulakarni, there was a village, to apply the village Patil anauna. '' And you took a poll (that is, Abhay, Assurance) invented by the village. '
The same case, the same content and the same date, the record plunge of a paper. There 'rajshri Grandpa Konddeo and governors of the country village town Yugoslavia' '(that is, brought boom to get settled back in the villages lying desert.) Is mentioned.
Shahaji Maharaj and matusri Jijamata kondadevaci what about the grandfather was a feeling? Chhatrapati Shahu Maharaj siravala provincial desakulakanryavisayi desakulakarni of the province that the decision tantayaca Deshpande, a yado Gangadhar, issued October 1, 1728 or to have a genuine vatanapatra available date. The case was filed as evidence in the documents that Grandpa kondadevane siravala maharajansamora Shahu provincial constable was a genuine letter sent April 2, 1646, or a date. That the letter is considered valid and is uddhrtahi vacanapatrata their Chhatrapati mentioned above. Grandfather kondadeva his letter Jijamata boss mentioned Sowbagyavathi matusri jijaau sir 'that was. Queen Jijamata, Chhatrapati Shivaji Maharaj and Grandpa Konddeo against counterfeit, write text dirty and mean James Lane and promotion and dissemination of the text mean that the church is the grandfather of patratala 'matusri jijaau boss' does not refer to the apt answer?
While working as subhedar job Shahaji Maharaj had to stay tantayance different dadajila vatanansambandhi nivadayanci documents are available in one of the nine in the presence of gotasabheta Grandpa. Grandfather kondadevane been brought under cultivation again bare tract, has been mentioned in many documents and denying in bakharim.
Province Baner Pune (Baner current) village Grandpa kondadevane drinking panyakarita dike has been built out in the letter mentioned one. (Peshwa daptaratuna selected paper, Volume 31, 65 accounts). Pune is one of the old paper flowing ambila odhayala grandfather built the dam kondadevane mentioned. (Pune Municipal Research Circle, Section 1, pin no. 48)
Grandpa's free sprhateci command is a symbolic annals Point ekyannava reality. Shahaji names in dadajine Shivapur (sahabaga name) was planted ambarai. He inadvertently broke her a mango, it is our mistake divide him chopping of hands went to, and they ask him to turn from it, and he himself cut the sleeve of his robe was a wolf. This account Shahaji Maharaj understood the dignity they sent clothes to comfort dadajila and then use the left sleeve dadajine wolf. That means that hakikatica. Word also interpreted secretary annals is also stated. The Word or akhyayika free is symbolic of Grandfather told the sprhapanabaddala. As the ruler of Baroda and Chhatrapati Shahu Maharaj Sansthan Karveer interpretations akhyayikeca that Mr. Maharaj Sayajirao Gaikwad Cover. Krushnarao arjuna kelusakara by Category 1 9 06 is written in the stamped caritrata Chhatrapati Shivaji Maharaj. They akhyayikeca same interpretations' Shahu memorial book or book editor Pvt. Dr. Jaisingrao Pawar Marathi power rise "is set in the book. As the Chhatrapati Shahu Maharaj (Satara) said before Grandpa Konddeo lahanasaca Brahmin was, but what he did to inasapha avarangajeba padasahasahi vandya jahale, damn it is mentioned in the letter was removed in a contemporary one occasion. Sahunce they are symbolic of what was laukika dadajica nyayipanabaddala damn.
They have to be unstoppable dadajine think that belief itself Shivaji maharajannahi, it can be seen in many contemporary documents. For example: the outgoing governors of the country mahadaji samaraja karyata Mawal leverage constable mahadaji narasa 7 October 1675, sent a letter to the Lord is available to this date. It is ekele Shivaji Maharaj quoted a letter sent samarajasa mahadaji. '' Sir (ie Shivaji Maharaj) who do not want new; True, they will be going on during the rule of Grandfather kondadevam '' he said in the letter that Shivaji Maharaj. Pune provincial niradhadi taraphetila parince or village patilaki about Shivaji Maharaj nirathadi leverage the constable Tanaji Janardana sent a letter on June 26, 1671 is available for this date. They patratahi 'vaikunthavasi Infrastructure (ie Shahaji Maharaj) is an agreement that is pantance his career calile and Grandpa, tenepramane walk, Interdict new tinny "he said. Pune provincial karhekathara taraphetila vanapuri been sent to the village of patilakivaruna lasted six villages etc. Saswad taraphetila they kacerituna leverage of 23 July 1671, is one of the tantaya a letter or a date. In this case it '' before such calile .. Grandpa Konddeo of his career will be, will be tenepranane Hali vartavane rajshri Infrastructure calile his career, which do not conduct its warning 'that' order rajshri sir '(that is, Shivaji Maharaj) has stated that it was. Powered by a new patilaki mavalammadhila was a dispute about the village. About Shivaji Maharaj desadhikari konhera Rudra sent to November 1, 1678 is available with a letter or a date. They patratahi 'Grandpa walk tenepramane that calile time of Konddeo' said.
Sivacaritrasahitya, Volume 3 3 99 th lekhankata Purander the Word killlyaci. It Shivaji Purander fort mahadaji Neelkanthrao is mentioned in a letter written by him. '' Dado Konddeo amhajavala was dilhe by father, that mrtyo steps, now we nirasrita. '' He said it is.
Grandfather Konddeo this Shahaji Maharaj was probably something. They know the name of the estate Peth Shivapur names and provide bandhavayaci castle at Khed Shivaji Maharaj Shivaji maharajankarita is karinyata khedebarya of the desapandayam.
Grandfather kondadeva after the death of Shivaji Maharaj sent many letters in '' Grandpa was unable to Konddeo governors of the country '' that is respectful mention.
Pune white gold anchor dharalyaca mentioning only six sakavalita point. Its last section, it is mentioned that:
'Shake 1557 Uwe name Shahaji Raje Bhosle this twelve thousand phaujeci command idalasaikaduna fake death anniversary. Saranjamasa muluka dilhe in Pune state dilha country. States (that is, Shahaji kings) put Thane puni to leverage your grandfather telling Konddeo malathanakara this subha. When white gold anchor on dharila. The peace. The governors of the country and settled in the province gavaganaci yani kasabyaci. ''
Pune white gold anchors that held on to mention that there was light, and is so far the only old paper is clearly mentioned in Grandpa kondadevaca.
Grandfather symbolic fear holds them concerning the performance of Shivaji Shivaji Maharaj granted kondadevane it now and have given up other contemporary and later kagadapatrammadhila evidence. Bakharimmadhila are mentioned so that puravyansi consistent and complementary. And they do not mind the law of evidence.
What Grandpa says about Chhatrapati Shivaji 9 1 Point paha
Pune tahada Y, sirwal, Supe, Indapur the province jahagira darobasta didhali to samai sahajiraje yanni Grandpa Konddeo Kulkarni, socks malathana .. write, to be honest about samai district delivered their Konddeo theviledadaji delivered by yekhatiyari their total tract ( Shahaji kings of them), which ever (Shivaji) and female (jeejaabaaee) junari have brought them apalyapasi house bandhona ubhayetasa annavastre by ciranjivasa (ie Shivaji Maharaj) to sahane. This order was vijyapurasa Karon Shahaji kings. Dadajipanti sivanerihuna jijausava siubasa brought along Lal Mahal bandhona ubhayetasa well ijatine left .. siubasa made sahane. ''
The annals' dadajipantaca died they were sixteen-seventeen varsamnce samai Shivajiraje, tyanni too mourn dadajipanta kramale (ie killed) to the samai '' he said.
Sir Bhosle their bakhara rich, ie sedagavakara Bhosle bakhara, or bakharitahi Shahaji system is described in detail by the kings jahagira dadajine to the boom. And finally '' Shivajiraje Ahikam school that siksadhari (the teacher) was prepared for the tyanni vidyabhyasata sivajiraje '' he said.
Sivadigvijaya bakharitadekhila 'Shivaji Maharaj Pune territory by dadajipanti Wherefore the school; Wrestling, taught course be sastrayuddha '' he said.
What evidence have they operate on dadajipanta of kamagirivisayice said sanksepane. Eminent historians now say briefly what they are removed from the conclusion of the evidence, and others.
Karveer Shri Chhatrapati Shahu Maharaj Sansthan adhivati ​​Sir Sayajirao Gaikwad of Baroda and Mr. Cover. Written by Arjun kelusakara Krushnarao Shivaji history was published in 1 9 06. The grandfather has a brief description of the work that he has done to the faithful and svamikaryadaksa nature and Shahaji Maharaj jahagira boom and '' such honest, given the man of pious and God fearing not fear difficulties gigantic ShahajiRaje to his son, there obvious and dadajinehi and talented these masters cute child with love and cheerfulness large '' he said. Mr. It is also said that before Mr kelusakara 'summary jamabandici system to maintain them, how well people settled, thus increasing the income of farmers by encouraging, horses, etc. How preservation of animals, soldiers-pawn should examine how they thevavayace door man, etc., servants willing to spare them desirable How to Get binabobhata works, how to maintain the discipline of the army and paga, etc. have received good little knowledge Maharaj dadajikaduna age. The experience and knowledge along the way, the best product and how it arises from what is known in all functions jagasa. ''
'Shahu memorial book or book editor Pvt. Dr. Jaisingrao Pawar Marathi power rise "or have their work assessed in a similar way to the book Grandpa kondadeva. They say, 'No she gelyasivaya by influencing the mind Maharaj cultured Examples dadojici daily rajyakarabharatila,' 'the honor with the teachers appear to this ideal karabharatahi their next milalyamuleca Maharaj,' 'Shivaji Maharaj being removed and hearing tantayanci tyancyasamoraca sit coats on thus, when doing so, his king is trained great (ie Dadoji kondadevaca) was intended, '' Summary, jijaisarakhi mother and Dadoji kondadevasarakha parents Maharaj pride in their labhalyamule, svadharmanistha, nitidhairya, courage, bravery, rajyakarabharakausalya, mutsaddegiri etc. creating points required by the rulers and kings of Maharashtra and appreciative of their continued growth. ''
Dr. Jaisingrao Pawar in his Shivaji and Sivakasi 'opinions asayacica on the book, they have expressed.
Pvt. Resident. Known. Gaikwad (principal and head of the Department of History, College of Chhatrapati Shivaji, Satara), Pvt. Ba. Martens. Sooryavanshee (History Department, the head of New College, Kolhapur) and Pvt. Vilas Patil (f. College Shivaji, Satara) written in the three "Chhatrapati Shivaji Maharaj and sivayuga 'book is a brief description of the performance Grandpa kondadeva. They called it '' the grandfather Konddev as Shivaji's teacher mentioned that it is nothing unreasonable, because the judge Shivaji, judges etc.

चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवरायांचे गुरू म्हणून दादोजी कोंडदेवांचे नाव राहिले नाही. पण शहाजी हेच शिवाजी महाराजांचे गुरू होते हे प्रस्थापित करणे सुरू झाले. तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष जयसिंगराव पवार यांचे या बाबतीतले प्रयत्न थक्क करणारे आहे.
इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे धडे आहेत. या पाठय़पुस्तकाला ‘शिवछत्रपती’ असे नाव दिलेले आहे. गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथीच्या इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा करून नवी सुधारित आवृत्ती नुकतीच बालभारतीतर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती तिचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार हे होते. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पाठय़पुस्तक आठ भाषांत तयार करण्यात आलं. या पुस्तकातील बदलाबद्दल प्रचंड वादळ निर्माण झालं. विशेषत: त्यातील शिवाजी महाराजांच्या गुरुपदावरून दादोजी कोंडदेवांचं नाव वगळल्याबद्दल डॉ. जयसिंगराव पवार हे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडलं. ‘चौथीच्या इतिहास पुस्तकातून दादोजी कोंडदेवाचे नाव गुरुत्वपदावरून वगळण्यावर कडक कारवाई करा’ असा आरोप करण्यापर्यंत काहींची मजल गेली. चौथीच्या इतिहासविषयक पाठय़पुस्तक
 
महामंडळाचे डॉ. जयसिंगराव पवार हे अध्यक्ष असल्यामुळे ते सर्वाच्या टीकेचे लक्ष्य झाले आहेत. याच्या उलट ‘इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकातील समितीने केलेला बदल कुणाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नसून- समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे’ असा खुलासा जयसिंगराव पवारांनी केला.
प्रसारमाध्यमांतून दररोज, ‘आज जयसिंगराव पवारांची काय खबरबात?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेव्हा या सर्व आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळांत मूळ प्रश्न काय आहे? तो नीट समजावून घेतला पाहिजे.
डॉ. जयसिंगराव पवारांची खबरबात अशी की, इयत्ता चौथीच्या इतिहास पाठय़पुस्तकातून त्यांनी दादोजी कोंडदेवांचे शैक्षणिक गुरू या नात्याने पूर्वीच्या पाठय़पुस्तकात जो, ‘दादोजी कोंडदेवांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले’ असा उल्लेख होता तो वगळून त्याच्याऐवजी, ‘शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली झाले’ असा नवा उल्लेख करण्यात आला. या संदर्भातील दादोजी कोंडदेवांचे चित्र वगळून त्याऐवजी शहाजीराजांचे चित्र टाकले आहे. यावरून दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असे डॉ. जयसिंगराव पवारांनी सूचित केले आहे. वास्तविक पाहता दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असे अनेकांचे मत होते व आहे. तसे ते जयसिंगरावांचेही असायला काही हरकत नाही.
परंतु एकेकाळी हेच जयसिंगराव पवार ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू होते’ असे म्हणत होते. आज अचानक त्यांचे हे मत कसे काय बदलले, हाच अनेकांच्या भुवया वर जाण्याचा मुद्दा आहे.
कोल्हापूरच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख म्हणून काम करीत असताना त्यांनी एम.ए.च्या परीक्षेसाठी नेमलेल्या व मुंबईच्या सी. जमनादास आणि कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात ‘दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होते’ असे म्हटले होते. या पुस्तकात ते दादोजी कोंडदेवांबद्दल काय म्हणतात ते वाचण्यासारखे आहे. या पुस्तकात डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात की,
‘मालोजीराजांनी प्राप्त केलेल्या गावचे कुलकण्र्यपण हे दादोजी कोंडदेवाच्या घराण्याकडे होते. तेव्हा भोसले घराण्याशी दादोजीचा संबंध बराच जुना होता. इ. स. १९३६ साली जेव्हा शहाजीराजे कर्नाटकात गेले तेव्हा मागे महाराष्ट्रात आपल्या जहागिरीची व्यवस्था करण्याची व कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांनी दादोजीवर सोपवली होती.. सततच्या लढायांमुळे शहाजीराजांची जहागीर उजाड बनली होती. ती समृद्ध करण्याची कामगिरी दादोजीने केली. एवढेच नव्हे तर शिवाजी राजांच्या शिक्षणाची चोख व्यवस्था त्याने केलेली होती. त्याच्यासारख्या व्यवहारज्ञानी व प्रामाणिक कारभाऱ्याकडून महाराजांनी राज्यकारभाराचे प्राथमिक धडे घेतले व आपल्या कर्तबगारीचा पाया घातला.. शिवकालात आजच्यासारख्या शाळा व महाविद्यालये नव्हती. घरंदाज मराठा घराण्यात आपल्या मुलावर खास शिक्षकाची नेमणूक केली जाई. शिवाजी महाराज एका बडय़ा जहागीरदाराचे चिरंजीव होते. कारभारात व राजकारणात आवश्यक असणाऱ्या सर्व शिक्षणाची व्यवस्था दादोजीने केली होती..
शिवाजी महाराजांच्या शिक्षणासंबंधी इतिहासकार श्री. त्र्यं. शं. शेजवळकर हे म्हणतात की, ‘‘दादोजी कोंडदेव याच्या शिक्षेखाली चालू मुसलमानी राज्यपद्धतीचे शिक्षण शिवाजीस उत्तमपैकी मिळाले. त्याला थोडेबहुत फारसी व उर्दू भाषांचे अध्ययनही करावे लागले असावे!..
शहाजीच्या जहागिरीचा कारभार पहात असता दादोजीच्या सोबत महाराज सतत असल्यामुळे राज्यकारभाराचे प्राथमिक धडे त्यांना मिळत गेले.. राज्यकर्त्यांजवळ कठोर शिक्षा असल्याशिवाय पुंडलोकांचे निर्दालन व गरिबांचे संरक्षण होऊ शकत नाही, हा धडा दादोजीने महाराष्ट्राला घालून दिला.. दैनंदिन राज्यकारभारातील दादोजीची उदाहरणे- संस्कारक्षम महाराजांच्या मनावर परिणाम करून गेल्याशिवाय राहिली नाहीत. दादोजी कोंडदेव नीतिमान, सचोटीचा व धार्मिक प्रवृत्तीचा गृहस्थ होता. आपल्या धन्याने आपणावर सोपविलेली कामगिरी प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे, त्यात बिलकूल लबाडी होता कामा नये याकडे त्याचा कटाक्ष असे.. अशी नीतिमत्ता असणारा शिक्षक महाराजांना मिळाल्यामुळेच पुढे त्यांच्या कारभारातही हा आदर्श दिसून येतो. शहाजीच्या जहागिरीची व्यवस्था लावता त्याने अनेक सुधारणा केल्या.. आणि हे सर्व शिवरायांना सोबत घेऊन दादोजी करीत होता. त्यामुळे याचे प्रशिक्षण दादोजीकडून शिवरायांना बालवयातच मिळाले.. वतनाच्या व भाऊबंदकीच्या अनेक कटकटी जहागिरीत चालू असत. त्याचे निकाल देण्याची जबाबदारी जहागिरीचे कारभारी म्हणून दादाजीवर येत असे. अशा प्रसंगी शिवाजी महाराजांना सदरेवर बसवून त्यांच्या समोरच्या तंटय़ांची सुनावणी व निकाल दिला जात असे. हे सर्व करत असता महाराजांना न्यायदानाचे प्रशिक्षण मिळावे हाच त्यांचा हेतू होता.. सारांश जिजाबाईसारखी माता व दादोजी कोंडदेवसारखा शिक्षक महाराजांना लाभल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्वाभिमान, स्वधर्मनिष्ठा, नीतिधैर्य, धाडस, शौर्य, राज्यकारभार कौशल्य, मुत्सद्देगिरी इत्यादी राज्यकर्त्यांस आवश्यक असणारे गुण निर्माण झाले व त्याचीच पुढे वाढ होऊन महाराष्ट्राला हा थोर राजा लाभला!’’
(मराठी सत्तेचा उदय : दादोजी कोंडदेव महाराज, पृष्ठ १०० ते १०२)
सदर उतारा थोडा लांबला खरा, पण डॉ. जयसिंगराव पवार यांची दादोजी कोंडदेवांबद्दलची मते वाचकाला कळावी म्हणून हा पंक्तिप्रपंच केला. वरील उताऱ्यावरून दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे शिक्षक होते हे सिद्ध होत नाही काय? परंतु अचानक ‘दादोजी कोंडदेव हे फक्त उत्तम प्रशासक होते’ असा नवा ‘पवित्रा’ जयसिंगराव पवारांनी कसा काय घेतला?
याबद्दलचा खुलासा करताना जयसिंगराव पवार म्हणतात की, ‘‘सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर ‘मराठी सत्तेचा उदय’ नावाचे एक एम.ए.चे क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजीचा शिक्षक म्हणून उल्लेख केला होता. माझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझा संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. ते पुस्तक मी १९७७ मध्ये लिहिले असून त्या वेळी ज्या पुस्तकांच्या आधारे ते क्रमिक पुस्तक लिहिले त्यात तसे उल्लेख होते. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. तेव्हा अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले की, दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू किंवा मार्गदर्शक नव्हते. तसा उल्लेख कोणत्याही समकालीन साधनांत मला आढळला नाही. त्यामुळे दि. २४ एप्रिल २००६ रोजी पुण्यातील एका जाहीर परिसंवादात ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू होते’ हे माझे पूर्वीचे मत बरोबर नसल्याचे नमूद केले होते. त्या वेळी माझी चूक झाली होती हे मी आता कबूल करत आहे. आज नवी साधनं पुढे आलेली असताना मी माझं जुनंच म्हणणं कसं काय कायम करणार? अत्यंत विश्वासार्ह साधन हाती आल्यानंतरही इतिहासकाराने आपली जुनीच मतं नोंदवावीत असे आमच्या विरोधकांना सुचवायचं आहे काय?’
जयसिंगरावांचा हा खुलासा वाचून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. एम.ए. पीएच. डी. झालेल्या एका इतिहासकाराने एम.ए.च्या परीक्षेसाठी लिहिलेले ते क्रमिक पुस्तक आहे. ते लिहिताना त्यांनी सर्वागीण अभ्यास करायला हवा होता. ‘ज्या पुस्तकाच्या आधारे ते क्रमिक पुस्तक लिहिले त्यात तसे उल्लेख होते.’’ याचा अर्थ कोणत्या तरी एखाद्या पुस्तकाच्या आधारे त्यांनी आपले पुस्तक लिहिले असा होतो. त्या वेळी त्यांनी अनेक पुस्तकांचा अभ्यास का केला नाही? डॉ. जयसिंगराव पवार नुसतेच लेखक नाहीत, ते इतिहास संशोधक आहेत. ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू नव्हते’ याचा साक्षात्कार जयसिंगराव पवारांना ३० वर्षांनंतर आणि दोन वर्षांपूर्वी झाला असला तरी ‘शिवाजीचे गुरू कोण?’ हा वाद फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. जयसिंगरावांनी जेव्हा हे ‘मराठी सत्तेचा उदय’ पुस्तक लिहिले त्या वेळी आणि त्यापूर्वीही ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू नव्हते’ असे म्हणणारे अनेक लोक होते. इतिहास संशोधक या नात्याने जयसिंगराव पवारांनी त्या सर्वाची पुस्तके व मते यांचा अभ्यास करणे आवश्यक नव्हते का? या सर्व मतमतांतरांचा अभ्यास जयसिंगराव पवारांनी त्या वेळी निश्चितच केलेला असणार. या अभ्यासाअंतीच त्यांनी ‘दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू होते’ असे आपले मत बनविलेले असणार. कदाचित त्या वेळी त्यांचा अभ्यास अपुरा झाला असेल आणि अभ्यास पुरा झाल्यावर आज त्यांचे मत बदलले असेल, पण हा बदल व्हायला ३०-३२ वर्षांचा एवढा प्रदीर्घ काळ का जावा लागला?
जेम्स लेन प्रकरण उद्भवल्यावरच जयसिंगराव पवारांना या प्रश्नाचा अभ्यास करायला सवड सापडली? इतिहास संशोधक असूनही गेली २५-३० वर्षे या प्रश्नाचा अभ्यास करण्याचे त्यांना का सुचले नाही? उशिरा का असेना, पण जयसिंगरावांना हे सुचले आणि त्यांनी आपल्या कामाच्या प्रचंड व्यापातून खास सवड काढून सर्व ऐतिहासिक- समकालीन साधने धुंडाळली. या तपासाअंती त्यांची मते बदलली आणि ती त्यांनी चौथीच्या नव्या पाठय़पुस्तकात ‘छापली’. त्यासाठी त्यांनी नवी ऐतिहासिक साधनं पुढं आणली.
जयसिंगरावांनी पुढं आणलेले नवं ऐतिहासिक साधन कोणतं? तर कवींद्र परमानंदलिखित ‘शिवभारत’ हा काव्यग्रंथ. आता याला नवं ऐतिहासिक साधन कसं म्हणायचं? ‘अत्यंत विश्वासार्ह समकालीन साधन’ म्हणून जयसिंगराव ज्या परमानंदकृत ‘शिवभारत’चा उल्लेख करतात व ‘ज्याच्या आधारे इयत्ता चौथीच्या इतिहास पाठय़पुस्तकाचं आम्ही पुनर्लेखन केलं’ असं म्हणतात त्या कवींद्र परमानंदकृत ‘शिवभारत’ या मूळ संस्कृत ग्रंथाचं भाषांतर व संपादन सदाशिव महादेव दिवेकर यांनी इ.स. १९२७ मध्येच प्रकाशात आणलं होतं. त्यांच्या या ‘शिवभारत’ची पहिली मराठी आवृत्ती इ.स. १९२७ सालीच प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे सुमारे ८०-८२ वर्षांपासून हे ऐतिहासिक साधन उपलब्ध असताना आज त्याला जयसिंगराव पवार ‘नवं साधन’ कसं काय म्हणतात? सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी एम.ए.साठी जेव्हा ‘मराठी सत्तेचा उदय’ हे क्रमिक पुस्तक डॉ. जयसिंगराव पवारांनी लिहिले त्या वेळीही परमानंदकृत ‘शिवभारत’चे भाषांतर उपलब्ध होतेच ना? तरीही ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू होते’ असेच मत डॉ. जयसिंगराव पवारांनी मांडले होते. पुलाखालून एवढे पाणी वाहून गेल्यावर आज त्यांचे मत अचानक बदलले, याला काय म्हणावे? गेली ३०-३२ वर्षे जयसिंगराव पवारांच्या ‘मराठी सत्तेचा उदय’ या पुस्तकाचा अभ्यास करून अनेक विद्यार्थी एम.ए. होऊन बाहेर पडले असतील. त्यांनी ‘‘दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरू होते. त्यांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले!’’ असेच शिक्षण घेतले. जयसिंगराव पवारांच्या हाताखाली शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलांची मुले ज्यांच्यासमोर इयत्ता चौथीचा बदललेला नवा इतिहास धडा असेल. ते म्हणतील की, ‘‘दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हतेच. ते कोण आहेत त्यांची नावेसुद्धा ठाऊक नाहीत!’’ दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते का नव्हते? याबद्दल दोन पिढीत संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम डॉ. जयसिंगराव पवार करीत आहेत. याबद्दल इतिहास त्यांना कधीही क्षमा करणार नाही.
ज्या शिवभारताच्या आधारावर जयसिंगराव पवारांनी चौथीच्या इतिहास पाठय़पुस्तकाचे पुनर्लेखन केले आहे त्या शिवभारताचा इतिहास लेखनासंदर्भात गौरव करताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात,
‘‘शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालिनत्त्व अनेक पुराव्यांनी सिद्ध केले आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची अगदी जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.’’
‘शिवभारत’ हे शिवचरित्राचे एक समकालीन साधन आहे याबद्दल वाद असण्याचे कारण नाही; परंतु ते ‘शिवाजीचे अधिकृत चरित्र’ आहे, असे म्हणता येणार नाही. शिवभारतामध्ये एकूण ३२ अध्याय असून, शहाजीच्या जन्मापासून ते शिवाजीचा शृंगारपुरात प्रवेश येथपर्यंतचा भाग यात आलेला आहे. म्हणजे इ.स. १६६१ पर्यंतचे शिवचरित्र यात आलेले आहे. इ.स. १६६१ ला शिवाजीचे वय ३१ होते. म्हणजे शिवाजीच्या वय वर्षे ३१ पर्यंतचाच इतिहास या शिवभारतात आलेला आहे. शिवाजीचा जन्म इ.स. १६३०चा आणि मृत्यू १६८० चा आहे. म्हणजे इ.स. १६६१ ते १६८० या १९ वर्षांचा शिवाजीचा इतिहास या शिवभारतात आलेला नाही. यात तानाजी मालुसरेचा उल्लेख आहे, पण दादोजी कोंडदेवाचा साधा नामोल्लेखही नाही. इ.स. १६६१ पर्यंतचाच भाग यात आलेला आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक व शिवाजीच्या मृत्यूचे त्यात वर्णन नाही. त्यामुळे शिवभारताला अधिकृत शिवचरित्र कसे म्हणता येईल? शिवभारतात जे उल्लेख आहेत ते अचूक आहेत, पण अनुल्लेखाचे काय करणार? शिवभारतात ज्या व्यक्ती किंवा प्रसंग यांचे उल्लेख नाहीत त्या घडल्याच नाहीत असे समजायचे का? असे समजल्यास अनवस्थाप्रसंग उद्भवेल. बखरी शिवाजीनंतर १०० वर्षांनी लिहिल्या त्यामुळे त्या अतिरंजित आहेत असे जयसिंगराव पवार म्हणतात. पण अतिरंजित वर्णने परमानंदाच्या शिवभारतात काय कमी आहेत? कवींद्र परमानंदाचा ‘शिवभारत’ हा काव्यग्रंथ आहे. त्यामुळे शिवभारत ही एक पद्यमय बखर आहे असेच म्हटले पाहिजे.
डॉ. जयसिंगराव पवार हे कवी परमानंदाच्या ‘शिवभारत’ या काव्यग्रंथाची वारंवार भलावण करताना दिसतात. या ‘शिवभारत’मध्ये नेमके काय आहे? परमानंदाने हे शिवभारत कधी रचले याचा उल्लेख ग्रंथात केलेला नाही. शिवाजीने शृंगारपूर घेऊन त्र्यंबक भास्कराची नेमणूक तिथला प्रमुख अधिकारी म्हणून केली इथपर्यंतची हकीगत या शिवभारतात आलेली आहे. या घटनेची तारीख जरी त्यात दिलेली नसली तरी ही घटना दि. २९ एप्रिल १६६१ रोजीची आहे हे इतर साधनांवरून सांगता येते. तसेच एके ठिकाणी अली आदिलशहाच्या सांगण्यावरून सिद्दी जौहर याला विषप्रयोग करून ठार मारण्यात आले अशा आशयाचा उल्लेख अंती आलेला आहे. सिद्धी जौहर दि. १७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर १६६१ या दरम्यान मरण पावला हे इतर साधनांवरून समजते. तारखेच्या दृष्टीने बघितले तर ही घटना शिवभारतात उल्लेखिलेली सर्वात अलीकडची घटना आहे. अर्थात यानंतर केव्हा तरी सध्या आपल्या हाती असलेले ‘शिवभारत’ रचून तयार झाले असले पाहिजे. इ.स. १६६१ नंतरचा शिवाजीचा इतिहास या शिवभारतात आलेला नाही. इयत्ता चौथीचे ‘शिवछत्रपती’ हे इतिहासाचे पाठय़पुस्तक तर संपूर्ण शिवचरित्राचे आहे. म्हणजे शिवाजीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या घटना यामध्ये अपेक्षित आहेत आणि तशा त्या या चौथीच्या नव्या पुस्तकात आलेल्या आहेत. आता या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो की, पाठय़पुस्तक समितीने शिवाजीनंतर शंभर-दीडशे वर्षांनी बखरीत लिहिलेला मजकूर प्रमाण न मानता समकालीन अशा फक्त ‘शिवभारत’चाच मजकूर प्रमाण मानायचा असा निर्णय घेतल्याने इ.स. १६६१ पर्यंतचा मजकूर ‘शिवभारत’च्या आधारे घेता येईल यात काही शंका नाही, पण त्यापुढचा शिवाजीचा १९ वर्षांचा उरलेला इतिहास शिवभारतात नाही त्याचे काय करायचे? या कालातील मजकूर कशाच्या आधारे घेणार? या ठिकाणी खबर वाङ्मयाचेच साहाय्य घेणार ना?
येथूनच डॉ. जयसिंगराव पवार (एम.ए., पीएच.डी.) यांनी इयत्ता चौथीच्या ‘शिवछत्रपती’ या इतिहास पाठय़पुस्तकाची ‘बखर’ लिहिली आहे. शिवभारतात दादोजी कोंडदेवांचा साधा नामोल्लेखही नाही म्हणून तो शिवरायाचा गुरू नाही असे जयसिंगराव म्हणतात. पण ‘शिवभारतात’ बाजीप्रभू देशपांडेचा तरी नामोल्लेख कोठे आहे? मग बाजीप्रभू देशपांडे झालाच नाही असे समजून त्याला इतिहासातून वगळायचे का? पण जयसिंगराव पवारांनी चौथीच्या इतिहास पुस्तकात दादोजी कोंडदेवावर एक परिच्छेद आणि बाजीप्रभू देशपांडेवर ‘शर्थीने खिंड लढवली’ हे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे, ते कशाच्या आधारावर? बखर वाङ्मयाच्याच ना? इ.स. १६६१ नंतरचा इतिहास शिवभारतात नाही तरी तो चौथीच्या ‘शिवछत्रपती’मध्ये आलेला आहे. अर्थात याला आधार बखर वाङ्मयाचाच असला पाहिजे.
दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरू नाहीत हे सिद्ध करण्यासाठी म्हणून जयसिंगराव पवारांनी ‘शिवरायांचे शिक्षण’ हा एक नवा पाठ समाविष्ट केला आहे. यामध्ये शिवभारताच्या आधारे शिवरायांच्या शिक्षणाचा वृत्तांत सादर केला आहे. या ग्रंथात नवव्या आणि दहाव्या अध्यायात शिवाजीच्या शिक्षणाचा उल्लेख आहे. त्यानुसार जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्लोक ७०-७१)
पुढे शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची व जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो की, शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्लोक २५-२७)
शिवभारतकार पुढे म्हणतो की, शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्वारोहण, गजारोहण, तलवार पट्टा, भाला इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र, शत्रूपक्षातून निसटून जाण्याची कला, जादुगिरी, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्लोक ३४-४०)
यावरून शहाजीने पाठविलेल्या अन्य शिक्षकाकडून शिवाजीचे शिक्षण झाले असे जयसिंगराव पवार म्हणतात. पण परमानंद हा शिवाजीचा समकालीन असूनही तो या शिक्षकांची नावे का सांगत नाही? ‘परमानंदाच्या शिवभारतातील स्थळांचे व व्यक्तीच्या नावांचे बरेचसे संशोधन आतापर्यंत झाले आहे. तथापि काही नावांचा तलास लावण्याचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही.’ याबद्दल स. म. दिवेकर दिलगिरी व्यक्त करतात. पण शहाजीने शिवरायांच्या शिक्षणासाठी जे काही विख्यात शिक्षक पाठवले त्यांची नावे अद्याप कोणालाही माहिती नाहीत. या अनामिक शिक्षकांचा संदर्भ जयसिंगराव पवार देतात, पण त्यांची नावे- गावे शोधून काढण्याची निकड त्यांना वाटत नाही. त्यामुळे जयसिंगराव पवार याबद्दल अधिक संशोधन करतील, अशी शक्यता फारच कमी आहे. शिवभारतात परमानंद शिवाजीच्या शिक्षणाच्या संदर्भात दादोजी कोंडदेवाचा उल्लेख टाळतो म्हणून जयसिंगराव पवार जर त्याला शैक्षणिक पदावरून हटवणार असतील तर मग चौथीच्या पुस्तकात ‘शिवाजीचे शिक्षण’ सांगताना त्यात पुन्हा ‘दादोजी कोंडदेवाची कामगिरी’ का घुसडली? म्हणजे गंमत बघा, दादोजीला गुरुपदावरून हटवण्यासाठी शिवाजीनंतर शंभर वर्षांनी लिहिल्या म्हणून बखरी नाकारायच्या आणि आपल्यावर जातीयतेचा आरोप येऊ नये म्हणून पुन्हा बखरीतीलच मजकूर उचलून वापरायचा, असा दुटप्पीपणा जयसिंगरावांनी चालवला आहे.
शिवभारतात जिजाबाईंचा जुजबी उल्लेख आहे. पण ‘शिवछत्रपती’मध्ये जयसिंगराव पवारांनी खास जिजाबाईंसाठी ‘शिवरायांचे शिक्षण’ हे प्रकरण आणले आहे. राज्याभिषेकाचे वर्णनच शिवभारतात नाही. पण चौथीच्या क्रमिक पुस्तकात शिवराज्याभिषेकाला भर दरबारात जिजाबाई हजर असल्याचे चित्र दाखवले आहे. (शिवछत्रपती, एक अपूर्व सोहळा : पृष्ठ ८३) पण याला पुरावा काय? राज्याभिषेकाच्या वेळी भर दरबारात जिजाबाई उपस्थित असल्याचा उल्लेख शिवभारतात तर नाहीच (कारण शिवभारतात इ. स. १६६१ पर्यंतचाच शिवाजीचा इतिहास आलेला आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेकाचे वर्णन त्यात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.) पण अन्य कोणत्या बखरीतही नाही. डॉ. जयसिंगराव पवारांच्या बखरीत मात्र शिवराज्याभिषेकाच्या वेळी भर दरबारात जिजाबाई सिंहासनारूढ झालेल्या दाखवल्या आहेत. शहाजीने काही शिक्षक पाठवले व त्यांनी शिवाजीला विविध विषय शिकवले असा उल्लेख शिवभारतात येतो. त्यामुळे या शिक्षकाकडून शिवाजीचे शिक्षण झाले असे म्हटले तर ते एक वेळ समजू शकते. पण ‘या अध्यापकवर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल. शिवराय पुणे जहागिरीत आले तरी त्यांचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखेखाली चालूच राहिले.’ (शिवरायांचे शिक्षण, पृष्ठ २६) हे सर्व संदर्भ जयसिंगरावांनी कोठून मिळवले? ‘हा घ्या अस्सल पुरावा’ म्हणून ज्या परमानंदाच्या शिवभारताचा उल्लेख जयसिंगराव करतात त्या शिवभारतात ‘शिवाजीचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखीखाली झाले’ असा कोठे चुकूनही उल्लेख आढळत नाही. याच्या उलट शिवभारतात शिवाजीच्या बालपणाच्या संदर्भात पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतात :
‘जो प्रभू स्वत: सातही लोकांचा आधार आहे तोसुद्धा दाईचे बोट धरून उठत असे.’ (अध्याय ७, श्लोक १२, पृष्ठ ६१)
‘आपल्या हस्तकमलांनी डोक्यावर धूळ उठवून घेऊन वाडय़ाच्या दरवाजापुढे खेळणाऱ्या त्या बालकास शिस्त लावण्यास आलेली दाई त्यास पाहून स्तब्ध होई.’ (अध्याय ७, श्लोक १५, १६, पृष्ठ ६२)
‘दाई टाळ्या वाजवू लागली की त्याची गंमत वाटून तो हास्यवदन करून अनेक प्रकारे नाचूबागडू लागे.’ (अध्याय ७, श्लोक १७, पृष्ठ ६२)
‘ज्याने ब्रह्मदेवाला लक्षणासह वेद पढविले तो स्वत: दाईच्या तोंडून निरनिराळे शब्द शिकत असे.’ ‘इच्छिलेले पुरविणारा तो खुषीत आला असता आपल्या अंगावरील दागिने भराभर उतरून दायांना देत असे.’
(अध्याय ७, श्लोक १८, १९, पृष्ठ ६२)
‘तो जवळ उभा राहून एकदम वाघासारखी गर्जना करून आपल्या प्रेमळ दाईससुद्धा भेडसावीत असे.’ (अध्याय ७, श्लोक २३, पृष्ठ ६३)
‘बोटांनी दटावणे इत्यादी उपायांनी दायांनी त्यास मनाई केली तरी तो शहाजीचा पुत्र त्या त्या बाललीलेत गर्क होई.’ ‘‘खा’ म्हटले तरी खात नसे, ‘पी’ म्हटले तरी पीत नसे आणि दायांनी त्यास आळवून ‘नीज’ म्हटले तरी तो निजत नसे.’ (अध्याय ७, श्लोक ३३, ३४, पृष्ठ ६४)
म्हणजे शिवभारतात कवी परमानंद शिवाजीच्या बालपणी दायांचे योगदान नमूद करतो. (जवळ जवळ ९-१० श्लोक तो खर्ची घालतो.) पण जिजाबाईच्या शिक्षणातील योगदानाबद्दल एखादा श्लोक तो लिहीत नाही. याचा अर्थ शिवाजी महाराजांचे शिक्षण दायांच्या देखरेखीखाली झाले असा लावायचा का? परमानंद शिवाजीचा समकालीन असूनही ‘शिवरायांचे शिक्षण जिजाबाईच्या देखरेखीखाली चालूच राहिले, याबद्दल एखादा श्लोकही त्याला लिहावासा का वाटला नाही?
शिवाजीच्या शिक्षणाच्या संदर्भात जिजाबाईचा उल्लेख परमानंदाच्या ‘शिवभारत’मध्ये तर नाहीच, पण समकालीन असलेल्या ‘सभासद बखर’मध्येसुद्धा नाही. ‘सभासद बखर’मध्ये जिजाबाईचा उल्लेख पुढीलप्रमाणे फक्त तीन वेळाच येतो :
(१) ‘जिजाऊ आऊचे पोटी शिवाजीराजे जन्मले’ (सभासद बखर : संपादक हेरवाडकर, पृष्ठ ३)
(२) ‘दादोजी बेंगरुळास शहाजीचे भेटीस गेला. त्याचे बरोबर राजेश्री शिवाजी व जिजाबाई आऊऐशी गेली.’ (सभासद बखर : हेरवाडकर संपादित : पृष्ठ ४)
(३) (अफजलखान वधापूर्वी) राजे जागे होऊन जिजाबाईआऊस बोलावून आणून स्वप्नाचे वर्तमान सांगितले.’ (सभासद बखर : संपादक हेरवाडकर, पृष्ठ १२)
शिवरायांच्या विवाहाबद्दल डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, ‘शिवराय चौदा वर्षांचे झाले तेव्हा जिजाबाईने त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू केली.. शिवबाकरता त्या मुली पाहू लागल्या. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई!’ (शिवछत्रपती, शिवरायाचे शिक्षण, पृष्ठ २८-२९)
ही ‘बखर’ जयसिंगरावांनी कशाच्या आधारावर लिहिली? कवींद्र परमानंदाच्या ‘शिवभारत’मध्ये, ‘कौमार्यदशा संपून ज्याला नुकतेच नवयौवन प्राप्त झाले आहे आणि मदनासारखे लावण्य अंगी खेळू लागल्यामुळे मनोहर अशा त्या शिवाजीला शीलवती, सती, रमणीय, रूपवती व अत्यंत गुणशालिनी अशी भार्या प्राप्त झाली’ (अध्याय १०, श्लोक ४२, ४३, पृष्ठ ९०) फक्त एवढाच उल्लेख येतो आणि ‘सभासद खबर’मध्ये शिवाजीच्या विवाहाबद्दल फक्त ‘राजियाची स्त्री- निंबाळकर यांची कन्या सईबाई केली होती ती प्रसूत जाहली.’ (सभासद बखर: संपादक हेरवाडकर, पृष्ठ ९) एवढे एकच वाक्य आलेले आहे. परमानंदाचे ‘शिवभारत’ आणि कृष्णाजी अनंत ‘सभासद बखर’ या दोन्ही समकालीन ऐतिहासिक साहित्यांत शिवाजीच्या विवाहाच्या संबंधात जिजाबाईचा सहभाग मुळीच दिसून येत नाही. उलट ‘शिवाजी महाराजांची इच्छा दादाजीने शहाजीराजास पत्रद्वारे विदित करून असे कळविले की, ‘आम्ही इकडे चांगली मुलगी पाहून कार्य आटपून घेतो.’ हा विचार पसंत पडून त्यांनी त्यास संमती दिली. त्याप्रमाणे दादोजीने शिर्के यांची कन्या सईबाई हिजशी इ. स. १६४० मध्ये पुणे मुक्कामी शिवाजी महाराजांचा विवाह मोठय़ा थाटाने साजरा केला.’ (छत्रपती शिवाजी महाराज : केळुस्कर, पृष्ठे ६०).
कवींद्र परमानंदाच्या ‘शिवभारत’मध्ये शहाजीचा थोरला मुलगा व शिवाजीचा थोरला भाऊ जो संभाजी त्याच्या विवाहाचे सविस्तर वर्णन आलेले आहे. (अध्याय ८, श्लोक १० ते १६, पृष्ठ ६६; ६७) पण परमानंद समकालीन असूनही त्याने शिवाजीचा विवाह कोणी जमवला? विवाह कसा झाला? याबद्दल अवाक्षरही बोलत नाही. असे का? शहाजीराजांनी शिवाजीचे शिक्षण, जिजाबाईचे संरक्षण व जहागिरीची देखभाल करण्यासाठी दादोजी कोंडदेवाची खास नेमणूक केल्याचा अनेक ऐतिहासिक साधनांत उल्लेख आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार ‘तारीख-इ-शिवाजी’ या ग्रंथाच्या आधारे असे म्हणतात की, ‘शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवाच्या हाती आपल्या जहागिरीची व्यवस्था इ. स. १६३६ मध्ये दिली तेव्हा त्यांनी त्यास असे सांगितले की, ‘माझी बायको जिजाबाई व पुत्र शिवाजी ही शिवनेरी किल्ल्यात आहेत, त्यास पुण्यास आणून आपल्या देखरेखीखाली ठेव व त्यास लागेल तेवढा पैसा खर्चासाठी दे!’ ज्याप्रमाणे दादोजी कोंडदेवाने पुण्यात जिजाबाई व शिवराय यांना राहण्यासाठी ‘लालमहाल’ बांधून दिला त्याचप्रमाणे शिवरायांच्या विवाहाबाबतही त्याने खटपट केली असणे सहज शक्य आहे. तेव्हा जिजाबाईने शिवाजीच्या विवाहाच्या बाबतीत पुढाकार घेतला असा उल्लेख शिवभारतात तरी येणार कसा? कवींद्र परमानंदाच्या ‘शिवभारत’मध्ये जे आहे तेच प्रमाण मानायचे असा जो निकष दादोजी कोंडदेवाच्या बाबत जयसिंगराव वापरतात तोच निकष ते जिजाबाईला का लावत नाहीत?
डॉ. जयसिंगराव पवार परमानंदच्या ‘शिवभारत’चा उपयोग फक्त दादोजी कोंडदेवाचा उल्लेख हटवण्यापुरता करतात. इतर बाबतीत ते मुक्त स्वातंत्र्य घेतात. परमानंदाचे ‘शिवभारत’ समकालीन असेल, पण जयसिंगराव पवार समजतात तेवढे विश्वसनीय मानता येणार नाही. खुद्द जयसिंगराव पवारांनासुद्धा ही गोष्ट अप्रत्यक्षपणे मान्य करावी लागली आहे. कारण ‘शिवभारत’मध्ये दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी, बाजी प्रभू देशपांडे यांचे उल्लेख नाहीत. तरीपण चौथीच्या पाठय़पुस्तकात या तिघांचाही उल्लेख त्यांना करावा लागला आहे. प्रशासक म्हणून त्याला मान्यता देऊन ‘दादोजी कोंडदेवाची कामगिरी’ हा एक परिच्छेद द्यावा लागला आहे. जयसिंगराव पवार समजतात तसे ‘शिवभारत’ हे शिवाजीचे अधिकृत चरित्र नव्हे. कारण त्यामध्ये इ. स. १६३० ते १६६१ पर्यंतचाच शिवाजीचा इतिहास आलेला आहे. शिवाजीचा ३१ वर्षांपर्यंतचाच इतिहास ‘शिवभारत’मध्ये आलेला असल्याने शिवाजीचे उर्वरित १९ वर्षांचे आयुष्य समजून घेण्यासाठी अन्य ऐतिहासिक साधनांचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे जयसिंगराव पवार समजतात तसे ‘शिवभारत’ला अधिकृत चरित्र कसे मानता येईल? शिवाजीचा जन्म इ. स. १६३० चा आणि दादोजी कोंडदेवाचा मृत्यू इ. स. १६४७चा. इ. स. १६३० ते इ. स. १६४७ पर्यंत म्हणजे जवळजवळ १७ वर्षे दादोजी कोंडदेव शिवचरित्रात वावरत होता. या अवधीत ‘दादोजी कोंडदेवाची कामगिरी’ सांगताना इयत्ता चौथीच्या पाठय़पुस्तकाचे पुनर्लेखन करणारे तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात की, ‘जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादोजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते; तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. शहाजीराजे व जिजाबाई यांच्यावर त्यांची निष्ठा होती. त्यांनी शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात जिजाबाई व शिवराय यांना राहण्यासाठी मोठा वाडा बांधला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी, म्हणून दादोजींनी त्यांना काही वर्षे साऱ्याची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत; म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादोजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर त्यांनी सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला.’ (शिवछत्रपती : शिवरायांचे शिक्षण : पृष्ठ २५-२६)
डॉ. जयसिंगराव पवार जरी आज दादोजी कोंडदेवाला गुरू मानत नसले तरीही वरील- प्रमाणे दादोजी कोंडदेवाची कामगिरी अधोरेखित करतात त्या दादोजी कोंडदेवाचा साधा नामोल्लेखही परमानंद करीत नाही, ही समकालीन ‘शिवभारत’ची विश्वासार्हता निश्चितच कमी करणारी आहे. जो कवींद्र परमानंद आपल्या ‘शिवभारत’मध्ये अनामिक शिक्षक आणि दायांचा ठळक उल्लेख करतो तोच परमानंद सुमारे सतरा वर्षे शिवरायाच्या जीवनात वावरणाऱ्या व अफाट प्रशासकीय कौशल्य दाखविणाऱ्या दादोजी कोंडदेवाला मात्र अनुल्लेखाने मारतो याचे सखेदाश्चर्य वाटते. कवींद्र परमानंदाच्या ‘शिवभारत’ची खबर घेऊन डॉ. जयसिंगराव पवारांनी इयत्ता चौथीच्या इतिहासाची ‘शिवछत्रपती’ बखर लिहावी, हे महाराष्ट्राचे दुर्दैव होय.
या ठिकाणी ‘शिवाजीचे गुरू कोण?’ या प्रश्नाच्या संदर्भात शहाजी विरुद्ध दादोजी कोंडदेव किंवा जिजाबाई विरुद्ध दादोजी कोंडदेव असा वाद घालणे व्यर्थ होय. शिक्षक या नात्याचे स्थान वेगळे आहे. दादोजी कोंडदेव यांच्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील योगदानाचा अनुल्लेख योग्य होणार नाही.
The fourth book of history is not the name kondadevance Dadoji as Shivaji teacher. But this was Calangutkar Shivaji teacher started to establish it. The chairman of the expert is astonishing to babatitale Jaisingrao Pawar.

The fourth standard of Chhatrapati Shivaji Maharaj pathayapustakata lessons of history are the Establishment Hindvi governments. Or pathayapustakala 'Chhatrapati' is the name given. This book was a history of almost 40 years has been the fourth of Maharashtra. New this year is the development of an improved version of it was published balabharatitarphe recently. This version, which was appointed Chairman of its expert committee. Pawar was Jaisingrao. The Committee's guidance of history classes led their fourth pathayapustaka was created eight languages. This book was created tremendous storm alterations. Especially the Shivaji Maharaj gurupadavaruna Dadoji kondadevancam name vagalalyabaddala Dr. Jaisingrao Pawar found bhovaryata name dispute. "The fourth book in the history of the Dadoji kondadevace name gurutvapadavaruna skip to crack" in the stage of some of karanyaparyanta charges. Fourth of historical pathayapustaka
 

Dr. Corporation. Pawar has been the target of criticism because it is all Jaisingrao president. On the contrary, the fourth class of the committee that changed the history of pathayapustakatila pressure on the whims of someone or someone's nasuna is based on contemporary evidence of that Pawar had revealed Jaisingrao.
Media every day, "Pawar today Jaisingrao what khabarabata?" Is the question being raised. And what is the question of the origin of all these allegations pratyaropam gadarolanta? It should be explained clearly.
Dr. Jaisingrao Pawar khabarabata that the standard Fourth of history pathayapustakatuna they Dadoji kondadevance academic mentor as previous pathayapustakata that, Dadoji kondadevam supervision Shivaji education is mentioned that it was him except, 'Shivaji Education ShahajiRaje had supervision' was a new mention. Excluding this context, but the image is cut kondadevance Dadoji picture ShahajiRaje. This is Dr. Dadoji Konddeo was not Shivaji teacher. Jaisingrao informed Pawar. This is the opinion of many that were actually Dadoji Konddeo was Shivaji teacher. They do not mind to be jayasingaravancehi.
But once this Jaisingrao Pawar Shivaji's guru Dadoji Konddeo it was that was said. How this suddenly changed their mind, this is the point to go on many eyebrows.
Kolhapur Shri Chhatrapati Shahaji while working as head of the department and appointed for the examination of college history and C MA of Mumbai. Jamnadas and made famous by the book 'Shivaji guru Dadoji Konddeo there was' it was said. They say what they read in the book of Dadoji kondadevambaddala. Dr. book. Jaisingrao says Pawar,
"This house was kulakanryapana village received malojirajanni of Dadoji kondadeva. When the house was too old relationship dadojica Bhosle. E. C. 1 9 36 in Karnataka before the state's responsibility to look after the family when sahajiraje been and they had to stand in your jahagirici Dadoji away .. on the ladhayammule ShahajiRaje jahagira had become bleak. She dadojine performance to enrich. And even if he had made arrangements apt Shivaji kings of education. Tyacyasarakhya vyavaharajnani and honest karabharyakaduna Maharaj took lessons in primary administrative and laid the foundation for our schools and colleges were not ajacyasarakhya kartabagarica .. era. Gharandaja was appointed as a teacher in your child's special Maratha house. Shivaji Maharaj was a son jahagiradarace record. The education system must be functioning and that politics had dadojine ..
Historian Shri Shivaji Maharaj's education. Tryam. Martens. This sejavalakara say, 'Dadoji Konddeo of siksekhali this Muslim rajyapaddhatice Write education received uttamapaiki. He must have had to study thodebahuta Persian and Urdu languages! ..
Since forever king with Dadoji the while looking management jahagirica Calangutkar of the administrative lessons been getting them .. rajyakartyanjavala can not protect strafe Unless pundalokance are glad and the poor, gave add Maharashtra Chapter dadojine .. by influencing the mind Maharaj daily rajyakarabharatila dadojici udaharane cultured gelyasivaya not left. Dadoji Konddeo good, upright and godly minded man was. Everyone should be entrusted with the performance of his job honestly for yourself, look at it because it was not a lie .. because it is found that this ideal morality with teachers karabharatahi milalyamuleca their next king. He made a number of improvements put in the jahagirici Calangutkar .. and the company was doing all this Dadoji Shivaji. So the training received .. dadojikaduna Shivaji balavayataca inheritance and bhaubandaki were several shriek jahagirita. His decision to give responsibility to the grandfather as the steward jahagirice. Shivaji Maharaj was given a hearing and decision on such occasions tantayanci sit in front of their coats on. While doing all this, Maharaj was great is their training might cause .. Summary jijabaisarakhi mother and teacher Dadoji kondadevasarakha Maharaj labhalyamule their place of pride, svadharmanistha, nitidhairya, courage, bravery, skill judge, was created mutsaddegiri points ahead of him with the necessary growth and rulers etc. Maharashtra and appreciative of the great king! '
(US power emerged: Dadoji Konddeo Sir, page 100 to 102)
The yield very little long, but Dr. According kondadevambaddalaci Dadoji Jaisingrao Pawar made the reader know as panktiprapanca. What does not prove that there was a teacher on utaryavaruna Shivaji Dadoji Konddeo? But suddenly, it was just the best Dadoji Konddeo administrator "in the new 'holy' How did Jaisingrao Pawar?
Pawar says Jaisingrao while revealing whether, around 30-32 years ago I Sivakasi on US power rise was gradual MA wrote a book called. I had mentioned it as dadojica teachers. This study was based on my book sivacaritram available. He was not certain my research books. As it was mentioned in the book that I wrote the book on the books of the time they are written sequentially to 1 in 9, 77. James Lane after the case came before the dadojica question airani time I checked out all the contemporary tools. And that became my opinion that specific study, there was no guide or guru Dadoji Konddeo there Shivaji. As mentioned I have not found any contemporary tools. So yesterday. A public seminar in Pune on 24 April 2006, Shivaji's guru Dadoji Konddeo there was "not just my opinion that was mentioned earlier. It was at that time, I was wrong, I have now promised. How to say I will always come along when my junanca new resources today? What is the most reliable tool in the hands of our opponents mean that after an old historian nondavavita your opinion? '
Jayasingaravanca this clarification was surprised to read us. Do not believe anybody. MA PH. D. The book is written sequentially to a historian for the examination of MA. That they should practice writing exhaustive. "Based on the book, as it was mentioned in the book written gradual. '' Which means when he wrote a book that was the basis of his book. Many of the books they did not practice at that time? Dr. Pawar Jaisingrao not merely the author, they are history researchers. "Shivaji's guru Dadoji Konddeo is not 'the interview Jaisingrao Pawar after 30 years and even though it was two years ago,' Who Shivaji's guru?" This argument has been going on since long ago. Jayasingaravanni when the 'Marathi power rise "at that time and tyapurvihi wrote the book' Shivaji guru Dadoji Konddeo is not 'deny that there were many people. Was it not necessary that all of the study of the history books as a researcher and opinions Jaisingrao Pawar? The study will be made at the time that Pawar Jaisingrao all matamatantaranca definitely. Or abhyasaantica they Dadoji Konddeo there Shivaji teacher was that your opinion will be made. Maybe that was insufficient time to study them and changed their opinion this will be after the complete study, but this change was to be 30-32 years old, so for the longest time of Java?
James Lane chapter udbhavalyavaraca Jaisingrao Pawar found time to study the issue? Why were not they, despite history researchers to study the issue of 25-30 years? Late the judgment, but it Up jayasingaravanna contemporary tools and dhundalali aitihasika all the time out of your work vyapatuna huge. And fourth, they changed their opinions or tapasaanti new pathayapustakata 'printed'. He brought a new historic resources moved.
She is supposed to bring the historic resource waste jayasingaravanni? If kavindra paramanandalikhita 'sivabharata is kavyagrantha. Now say how the new historical resource? 'Very reliable contemporary means as Jaisingrao which paramanandakrta' sivabharataca mentioned that and we did pathayapustakacam rewrite history on the basis of the fourth classes 'that says kavindra paramanandakrta' sivabharata the original Sanskrit granthacam translation and editing Sadaashiv Mahadev DIVEKAR by isa . 1 9 27 midway was brought to light. The 'first US version sivabharataci Category 1 9 27 salica has been published. Is available in about 80-82 years from now, he has been a historical resource Jaisingrao Pawar 'new tool called "How? About 30-32 years ago, when the MA Marathi power rise this book Dr. gradual. Pawar wrote at that time Jaisingrao paramanandakrta 'sivabharatace version were not available? However, Shivaji's guru Dadoji Konddeo there were "so Dr. mind. Pawar had expressed Jaisingrao. Pulakhaluna so suddenly changed their opinion on the last day to carry water, what shall we say this? Pawar was 30-32 years Jaisingrao Marathi power rise "book study by MA students And will fall out. He 'Dadoji Konddeo was Shivaji's guru. Shivaji was under the supervision of their education! '' So he studied. Children of the children of students coming out of the sub Pawar Jaisingrao will be a lesson to learn the history of the new standard is changed, the fourth jyancyasamora. They say that, '' the guru of Shivaji Dadoji Konddeo was not there. They do not know who they are navesuddha! '' Dadoji Konddeo was not Shivaji's teacher? Dr. creating sambhramavastha generation two about it. Jaisingrao are Pawar. History will never forgive them about it.
On the basis of the fourth sivabharata Jaisingrao Pawar has been rewriting the history pathayapustakace that while Dr. glory lekhanasandarbhata history sivabharataca. Jaisingrao says Pawar,
'' This sivacaritrace sivabharata is a contemporary and very reliable tool. Bliss sivakalinattva has been proven many evidence. Since you say that ecstasy is given crafted poetry of Shivaji and his credibility was repeatedly suffix does not matter, because you understand that it is an official character Shivaji. Bliss was nearly sivacaritraci information and can be found in the book that honestly stated kelyacehi. Other reliable information confirmed the device, so the book reveals. ''
'Sivabharata' not to be contentious about this sivacaritrace is a contemporary medium; But they 'official Shivaji character ", that is not to be. Sivabharata in a total of 32 chapters, which has been in part through access from birth Calangutkar srngarapurata Shivaji. Is born From 1661 has been the source. Category 1661 At the age of 31, Shivaji was. Shivaji's been 31 years of age or sivabharatata paryantacaca history. Write born 1630 to 1680 and died of. Is born 1661 to 1680, or 1 or 9 years old, has not been the history of Shivaji sivabharatata. This TANAJI malusareca mentioned, but not simple naming Dadoji kondadevaca. Category Paryantacaca 1661 has been part of it.

No comments:

Post a Comment